रेगे, सदानंद शांताराम (२१ जून १९२३ ते २१ सप्टेंबर १९८२) कवी, कथाकार, अनुवादक. जन्म : राजापूर (जिल्हा- रत्नागिरी) येथे आजोळी. पुढचे सर्व आयुष्य मुंबईत.
१९४० साली दादरच्या छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर काही काळ जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये. परंतु परिस्थितीमुळे ते शिक्षण सोडून १९४२पासूनच नोकरीस सुरुवात. सुरुवातीला किरकोळ नोकऱ्या. १९५८ साली बी.ए.
१९५१ साली 'धनुर्धारी'त पहिली कथा. १९४८ साली 'अभिरुची'त पहिली कविता. हयातीत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली.
रेग्यांची कविता काहीशा विक्षिप्त, विदुषकी पद्धतीने विश्वाविषयीचे आपले आकलन कधी चिंतनशील होऊन, कधी भाष्य वा प्रतिक्रिया प्रकट करीत व्यक्त करते.

संक्षिप्त वाङ्मय कोश, पॉप्युलर प्रकाशन - यातून ही छोटीशी नोंद काढलेय. बाकीचं ब्लॉगमधील नोंदींमध्ये आहेच.

Friday, March 9, 2012

सदू आणि विंदा

- नामदेव ढसाळ


सदानंद रेगे आणि माझी अगदी जिगरी दोस्ती. सदूच मला विंदांकडे घेऊन गेला होता. त्यांच्या त्या ओझरत्या भेटीनेही मला कायम मोहीत केलं ते विंदांच्या मोकळ्याढाकळ्या वागण्याने. कुठेही लपवाछपवी नाही, ओठात एक पोटात एक असा व्यवहार नाही, जे आहे ते स्पष्ट आणि स्वच्छ! सदूच्या कवितांवर त्यांचे विशेष प्रेम. त्याच्या कविता ऐकल्यानंतर त्या शब्दकळांच्या प्रतिमासृष्टीवर विंदा इतके खूश होऊन जायचे की ते खुर्चीतून उठायचे, उभे राहायचे आणि म्हणायचे, "सदू, तुझे पाय इकडे कर पाहू...' असं म्हणत त्याला दिलखुलास मिठी मारायचे...

***

विंदा करंदीकरांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या आठवणी जागवणारा नामदेव ढसाळ यांचा मजकूर 'सकाळ'मध्ये १५ मार्च २०१०ला प्रसिद्ध झाला. या मजकुराची फक्त सुरवात इथे दिलेय ती केवळ संदर्भासाठी. मूळ मजकुराचा उद्देश आणि संदर्भ वेगळा असला तरी रेगे, करंदीकर, ढसाळ यांच्यासंबंधीचा अगदी थोडासा का होईना उलगडा या परिच्छेदावरून व्हावा एवढ्याचसाठी -

No comments:

Post a Comment

मित्र